हिंदू समाज सशक्त होईल; तेव्हाच भारताची दखल घेतली जाईल : भागवत   

नवी दिल्ली : भारताची एकता ही हिंदूंच्या सुरक्षिततेची हमी आहे. हिंदू समाज व भारत एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. त्यांची मुळे खूप खोल आणि घट्ट आहेत. हिंदू समाज सशक्त होईल तेव्हाच भारतही मजबूत होईल आणि त्यातून भारताला सन्मान मिळेल, भारताची दखल घेतली जाईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 
 
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मोहन भागवत यांनी भारताच्या शेजारील देशांमध्ये होणार्‍या हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांवर बोट ठेवले. तसेच त्यांनी मानवाधिकार संघटनांच्या मौनावरून प्रश्न उपस्थित केले. हिंदू समाज सशक्त होत नाही, तोवर जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही. त्यांची कोणी दखल घेणार नाही, असेही ते म्हणाले.
 
भागवत म्हणाले, हिंदू समाज व भारत एकमेकांशी खूप घट्ट आणि खोलपर्यंत जोडलेले आहेत. हिंदूंच्या प्रतिष्ठेतूनच भारताला गौरवप्राप्ती होईल. जे लोक आज स्वतःला हिंदू मानत नाहीत ते देखील कधीकाळी हिंदू होते, तरीदेखील त्यांना आपल्याबरोबर घेऊन पुढे जाण्याची क्षमता व इच्छा केवळ हिंदूंमध्येच आहे, आणि हिंदू सुमदाय ती इच्छा दाखवत आला आहे.
 

Related Articles